१. आदिवासी समाजातील दुर्बल असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करणे.
२. समाजाच्या विविध प्रश्नासाठी आणि त्यावरील उपाय योजनेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
३. समाजाचा सर्वांगीण विकास करणे.
सर्वतः आणि अंतिमतः समाज हा मोठा आहे आणि "उबंटू-समाज आहे म्हणून आपण आहोत" या भावनेतून:
१. १००% समाजकार्य , 0% राजकारण (100% Socialism, 0% Politics).
२. समाजाचा दर्जा उंचावणे, ठराविक व्यक्तीचा नाही (Uplift community, Not person).
३. समाजाने समाजाचा सर्वांगीण विकास करणे (Uplift community by community).
विचार, वेळ आणि पैसा यांचा समन्वय साधत असताना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी असणारे समाज बांधव ज्यांनी सामाजिकआरक्षणाच्या जोरावर स्वतःची आर्थिक आणि भौतिक उन्नती साधली आहे त्यांनी 'Pay Back to Society' या भावनेतून दरमिा हकमान 100/- रुपये किवा त्यापेक्षा अधिक रक्कम "उबंटु" या समाज संस्थेच्या बँक खात्यावर जमा करावी.
आदिवासी समाजातील नोकरदार व व्यावसायिक वर्ग हाच ‘पैसा’ या साधन निर्मितीचा मुख्य कणा असणार आहे. समाजातील बुद्धीजीवी वर्गाचे प्रामाणिक विचार आणि सुशिक्षित बेरोजगार युवा-तरुण यांचा वेळ यांचा समन्वय साधून ग्रामीण व शहरी भागातील आपल्या बांधवांच्याविकासाचे आणि उन्नत व प्रगतीशील समाज व्ययस्था निर्मितीचे स्वप्न आपण वास्तवात आणणार आहोत. आपण सर्वच जणया समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहोत, प्रश्न फक्त एवढाच की आपल्याला या समाजव्यवस्थेमध्ये कार्यरत राहून आपले नैतिक दायित्व पूर्ण करायचे आहे. या समाजव्यवस्थेमध्ये कोणीही नेता नाही, कोणीही लहान किवा मोठा नाही. आपण सर्वच जण फक्त समाज म्हणून, 'उबंटु' म्हणजेच 'समाज आहे म्हणून मी आहे’ या एकाच भावनेने जोडले जाणार आहोत आणि हि व्यवस्था पिढ्या अन पिढ्या चालू राहणार आहे. हि व्यवस्था एक पर्यायी उत्तर आहे वर्चस्ववादि मानसिकता व आदिवासी समाजाचे शोषण करणारया सद्य व्यवस्थेला जिथे भुकेल्याला अन्न, सर्वाना शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्ध केला जाईलआणि मुख्य म्हणजे या देशात आणि विश्वात आदिवासी समाजाची एक ओळख निर्माण करून आपल्या आदिवासी समाजाचा स्वावलंबी समाजव्यवस्था.
हि व्यवस्था आपण आज बनवू पाहतो आहोत, मात्र ती पूर्ण होणार नाही जोपर्यंत प्रत्येक जमातीतील, प्रत्येक गावातील, महाराष्ट्रातील, या भारत देशातील किंबहुना या विश्वातील आदिवासी 'उबंटू 'या विचारधारेशी आणि या समाजव्यवस्थेशी जुळणार नाहीत. म्हणूनच आपल्या उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी, आजचा वर्तमानआपणाला संधी देत आहे की आपण या व्यवस्थेचा भाग होऊन, एकमेकांच्या सहकार्याने आपल्या सर्वांचा भविष्यकाळ उज्ज्वल करू या. आदिवासी समाजाच्या स्वावलंबी समाजव्यवस्थेचा भाग होण्यासाठी आपल्या “उबंटू” आदिवासी समाज संस्थेला किवा उबंटु- आदिवासी सेवक बंधूला संपका करा….
एका मानववंशशास्त्रज्ञाने एका आफ्रिकन जमातीतील मुलांना एक खेळ सांगितला. त्याने एका झाडाजवळ फळांनी भरलेली टोपली ठेवली आणि मुलांना सांगितलं की, जो तिथे सर्वात आधी पोहोचेल त्याला ती सर्व गोड फळं मिळतील. जेव्हा त्याने त्यांना पळायला सांगितलं तेव्हा ते सगळे एकमेकांचे हात हातात घेऊन एकत्र धावले आणि मग एकत्र बसून त्यांच्या ट्रीटचा आनंद लुटत बसले. जेव्हा त्याने त्यांना विचारले की, ते असे का धावले आहेत कारण जिंकणार्या कुणा एकासाठी ती सर्व फळे असू शकली असती त्यावर त्यांचे उत्तर होते “उबंटु” म्हणजे ‘मी आहे कारण आपण आहोत’; म्हणजेच ‘समाज आहे म्हणुन मी आहे’.
आदिवासी समाजातील व्यक्ती/संघटना यांना संघटित करून त्यांचा विचार, वेळ आणि पैसा यांचा समन्वय साधून, समाजऋण फेडणे (Pay Back to Society) या भावनेतून, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच शिक्षण (साक्षरता, सांस्कृतिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, रोजगार शिक्षण, सामाजिक मूल्य शिक्षण इ. ) रोजगार, आरोग्य व सामाजिक दर्जा यासंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वावलंबी समाज व्यवस्था निर्माण करणे.
आपण या समाजव्यवस्थेचा भागहोण्यासाठी आर्थिक दृष्टीने सधन (दरमहा किमान 10,000/- उत्पन्न असणारे समाज बांधव) बांधवानी किमान 100/- रुपये किवा त्यापेक्षा अधिक ऐष्क्रिक रक्कम दर महिन्याला 'उबंटू- आदिवासी समाज संस्था' च्या बँक खात्यावर जमा करावी.